Share News

आमदार आसिफ (राजू) सेठ यांचा कणबर्गी भागात जनता दरबार, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

बेळगाव : आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी कणबर्गी परिसराला भेट देत जनता दरबार आयोजित करून नागरिकांशी थेट संवाद साधला. या उपक्रमाद्वारे स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेण्यावर भर देण्यात आला.

भेटीदरम्यान आमदारांनी नागरिकांसह परिसराचा दौरा करत नागरी सुविधांची पाहणी केली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या समस्यांकडे त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील तसेच परिसरातील सुविधांमध्ये सुधारणा केली जाईल, असे आश्वासन आमदार सेठ यांनी दिले.

यावेळी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी आमदारांच्या या उपक्रमाचे स्वागत करत थेट संवादामुळे समस्या सोडवण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.


Share News