
बेळगाव जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आधी सरकारने जनावरांंकरिता चारा आणि वैरणची योजना द्वारे व्यवस्था केली होती मात्र तो चारा देण्याकरिता देखील सरकार देत नसल्याने जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. चारा उगवण्याकरिता दोन महिन्यांचा अवधी लागतो आता जरी पाऊस पडला तरी दोन महिने गवत येण्याकरिता अवधी लागणार आहे त्यामुळे सरकारने हे दोन महिने तरी जनावरांकरिता चारा व गवत ची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.